शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

मरळनाथपूरचा घोटाळा विधिमंडळात! धनंजय मुंडे यांच्याकडून आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:11 IST

इस्लामपूर : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशी कृषी विभागाच्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर या गावातच झालेल्या घोटाळ्यावरुन

ठळक मुद्देसदाभाऊंकडून पुरावे सादर; घोटाळ्याचे सर्व आक्षेप फेटाळले

इस्लामपूर : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशी कृषी विभागाच्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर या गावातच झालेल्या घोटाळ्यावरुन घमासान माजले. या प्रकरणात खोत यांना घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. मात्र सदाभाऊ खोत यांनी आरोपांना कागदोपत्री पुरावे सादर केले.अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेवेळी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, मरळनाथपूर येथे कोरडवाहू शेती अभियानांतर्गत योजनेचा लाभ देताना अनियमितता आणि कायद्याची चाकोरी सोडून काम झाल्याचा आरोप केला. २0१४—१५ ला मरळनाथपूर गावाची कोरडवाहू शेती अभियानासाठी निवड झाली. या योजनेचा लाभ जवळचे नातेवाईक आणि आप्तेष्टांना दिला गेला आहे. मंत्री खोत यांचे भाचे संदीप शामराव खोत यांची जमीन आणि ट्रॅक्टर नसताना त्यांना अवजारे दिली गेली. सुनील मारुती खोत यांचे क्षेत्र २0 गुंठ्यापेक्षा कमी असताना त्यांना ४ लाखांहून अधिकची अवजारे दिली गेली. महादेव ज्ञानू पावणे यांना २ लाखाहून अधिकची अवजारे दिली गेली. या अर्जावर कोणत्याही कृषी अधिकाऱ्याची मंजुरी नसल्याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले.

ज्या शेतकरी बचत गटांची नोंदणी नाही, त्यांना पाईप खरेदीसाठी अनुदान दिले गेले. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आणि वीज कनेक्शन नाही, त्यांना विद्युत पंपांचे वाटप केले गेले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातही अनुदान देताना अनियमितता झाली आहे. त्यामुळे या सर्व घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली होती.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुंडेंच्या प्रत्येक आरोपाचे पुराव्यानिशी खंडन केले. मे २0१३ मध्ये आघाडी सरकारच्या काळात कोरडवाहू शेती अभियान योजनेसाठी मरळनाथपूरची निवड झाली. त्यावेळी १ कोटी ८0 लाखांचा प्रकल्प आराखडा होता. प्रत्यक्षात मात्र ४८ लाखांचा निधी प्राप्त झाला, याकडे खोत यांनी लक्ष वेधले. जे आरोप विरोधकांनी केले, ते माहिती अधिकाराचा चुकीचा वापर करणाºया कार्यकर्त्यांकडून अपुरी माहिती दिल्यामुळेच केले गेले, असा टोला त्यांनी मारला.

संदीप खोत ज्या मरळनाथ विकास संस्थेचे सचिव आहेत, त्या धर्मादाय नोंदणी असणाऱ्या संस्थेला या योजनेतील अवजारांचा लाभ दिला गेला आहे. संस्थेकडे स्वत:च्या मालकीचा ट्रॅक्टर आहे. त्याची कागदपत्रे खोत यांनी सभागृहात दाखवली. सुनील खोत यांना व्यक्तिगतरित्या फक्त ७५ हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. मरळनाथ शेतकरी स्वयंसाहाय्यता बचत गटाची धर्मादाय नोंदणी आहे. या गटाच्या सदस्यांनी २0१४ लाच प्रतिज्ञापत्र दिल्याचे पुरावे मंत्री खोत यांनी दाखवले.विरोधी सदस्यांनी माहिती घ्यायला हवी..!मागणी अर्जांवर कृषी अधिकाºयांची मंजुरी नाही, हा मुंडे यांचा आरोप फेटाळून लावत खोत यांनी, लाभार्थी निवड यादी ग्रामसभेत संमत केली जाते. सभेच्या मान्यतेनंतरच हा लाभ दिला जातो. शेतकºयांनी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मंडळाकडूनच अवजारांची खरेदी केली आहे. आमदार शिवाजीराव नाईक, तत्कालीन जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांच्याहस्ते या अवजारांचे जाहीरपणे वाटप केले आहे. ग्रामीण भागात शेतकरी सामाईक पध्दतीने विहीर खुदाई करतात आणि त्याच्यावर एकाच शेतकºयाच्या नावाने वीज कनेक्शन घेतात, याची माहिती विरोधी सदस्यांनी घ्यायला हवी होती, असा टोला खोत यांनी मारला.